मुंबई : कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
यावेळी बोलतां त्यांनी भाजप सरकरवर सडकून टीका देखील केली. ‘दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे,’ असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरातांच्या या आरोपाला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर झालेल्या आरोपांची आठवण करून दिली आहे. ‘जी नाचक्की १९ महिने लादलेल्या आणीबाणीमुळे, सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार मुळे, दिल्ली दंगलीत ठार मारलेल्या हजारो शिखांमुळे, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?’ असा खोचक सवाल त्यांनी काँग्रेसला केला आहे.
मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप…
जी नाचक्की १९ महिने लादलेल्या आणीबाणीमुळे, सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार मुळे,दिल्ली दंगलीत ठार मारलेल्या हजारो शिखांमुळे, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना? pic.twitter.com/0D3LZ8m1EJ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- महाराष्ट्रात काँग्रेस आगामी काळात एक नंबरचा पक्ष बनवणार; नाना पटोलेंची डरकाळी !
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय


