Share

‘ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. ‘महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणं राज्य सरकारच्या हातात नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नाहीत, त्यामुळे दर कमी करणं हे केंद्र सरकारचं काम आहे’, असं संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ‘सध्या महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारच्या हाती वसुलीच्या कले व्यतिरिक्त काहीच नाही…’, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकार राज्य सरकारची आर्थिक कोंडी करत आहे. सरकार पाडण्यासाठी रोज भाजपची कारस्थाने सुरू आहेत. भाजपचे लोक महागाईबद्दल बोलत नाही. त्रिपुऱ्यात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसाठी भाजपा महाराष्ट्रात आंदोलन करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!