Share

“मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या किमान लसीकरणावर तरी फेसबुक लाईव्ह करावे”, भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न राज्य सरकार आणि प्रशासकीय पातळीवर केले जात आहेत. मात्र, तरीही राज्याच्या १६ जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याचे प्रमाण ५५% पेक्षा कमी आहे. खंडणी, पेंग्विन पालन, नारायण राणे अटक आदीप्रकणावरून थयथयाट यातच सरकारचा सगळा वेळ ‘सत्कारणी’ लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या किमान लसीकरणावर तरी फेसबुक लाईव्ह करावे ही नम्र विनंती.” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान सोलापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, बुलढाणा, लातूर, यवतमाळ, परभणी, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या अजूनही ५५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. तर सांगली, गोंदिया कोल्हापूर आणि चंद्रपूर येथे हे प्रमाण ९४ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!