🕒 1 min read
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती (Shivjayanti २०२२) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
“तुडुंब गर्दीत आपल्या पक्षाचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…?”,असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
तुडुंब गर्दीत आपल्या पक्षाचे कार्यक्रम आयोजित करनाऱ्या मुख्यमंत्र्यांना
शिवजयंती उत्सवावर संख्येचे बंधन घालताना जनाची नाही तर मनाची तरी…? pic.twitter.com/oXcoCioZAc— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2022
दरम्यान कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सण- उत्सवांवर निर्बंध राहिले आहेत. मात्र यंदा कोरोना संक्रमण कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकराने निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा शिवजयंती उत्सवही धूमधडाक्यात पार पडणार आहे. मात्र भाजपने संख्येतील मर्यादावरून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भाजपचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना-सचिन सावंत
- “अण्णांनी महाराष्ट्राचा अपमान गिळला…” ; शिवसेनेची खोचक टीका
- हिजाब परिधान करणं ही वयक्तित बाब परंतु… तृप्ती देसाई यांची प्रतिक्रया
- गोवा विधानसभेसाठी विक्रमी मतदान, राजकीय पक्षांची धाकधुक वाढली
- “ग्रामपंचायत भाजपची, सोसायटी भाजपची तरी…”; दरेकरांपुढे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
