🕒 1 min read
मुंबई : राज्य सरकारने नुकतीच किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे विरोधकांतून महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. आता समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारे म्हणाले, वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते. शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात १ हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवालही अण्णांनी उपस्थित केला आहे.
लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास राज्य सरकारचा दिसून येतो. सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-
“नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया
-
दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा; म्हणाली, “मी आणि आलियाने केला पुरुषांच्या..”
-
“शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्याची देखील परवानगी द्यावी”, भाजप खासदाराचा संताप
-
राज्यात अनेक प्रश्न असून सरकारला केवळ मद्यविक्रीत रस- नवनीत राणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
