Share

…हे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजपच्या मुंबई विभागीय युवक आघाडीचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar)यांनी नवाब मलिक (nawab malik )तसेच महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टोला लगावला आहे.

ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? असा सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान कंबोज यांनी दाखल केलेल्या फौजदारी स्वरुपाच्या बदनामीबाबतच्या तक्रारीवर न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रक्रिया नोटीस बजावली होती. गेल्या महिन्यात एनसीबीने क्रूझवर छापा टाकला होता. यानंतर मलिक यांनी माझी आणि माझ्या मेहुण्याची बदनामी केल्याचा आरोप कंबोज यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

मलिक यांच्या वक्तव्यामुळे तक्रारदाराच्या प्रतिमेला तडा गेल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ५०० (मानहानी) अंतर्गत मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणीच मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!