Share

“…आणि हे रोज मिशीला पीळ देऊन मर्दपणाच्या बाता करताय”, भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेनेला धनुष्य बाण हे चिन्ह मिळाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. तद्पश्चात याच मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१९८४ ची लोकसभा निवडणूक शिवसेनेने भाजपच्या कमळ निशाणीवर लढवली आणि हे रोज मिशीला पीळ देऊन मर्दपणाच्या बाता करताय’, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना१० ते १२ जागांवर लढणार असून आतापर्यंत शिवसेनेने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे. तर उत्तरप्रदेशातून शिवसेना ५० जागांवर लढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!