🕒 1 min read
पुणे : देशाच्या स्वांतत्र्यलढाईत १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर एका नेतृत्वाची गरज होती त्यातून १८८५ साली राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशात एक लढा उभा केला. काँग्रेसच्या स्थापनेमुळे भारत एक राष्ट्र म्हणून जगाला ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला.
मीठाचा सत्याग्रह, अहसहकार चळवळीच्या माध्यमातून देशात सर्वांना बरोबर घेऊन एक लढा उभा राहिला. १९४२ ला चले जाव ची हाक दिली गेली आणि नंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश एकजुटीने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला. भारताला एक वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका राहिली आहे.
दरम्यान,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिन काल राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात आला.मात्र सध्या विशेष चर्चा सुरु आहे ती पुण्यात झालेल्या एका घटनेची. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र पुणे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये मात्र काल अनोखं दृष्य पहायला मिळालं.कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला चक्क भाजपाच्या नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेस कार्यालयाला भेट दिली.
आज काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील काँग्रेस भवनामध्ये जाऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. शहराध्यक्ष श्री रमेश बागवे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी महापौर @mohol_murlidhar, शहराध्यक्ष @jagdishmulikbjp, सभागृह नेते गणेश बिडकर, pic.twitter.com/XITspnIfIV
— Girish Bapat (@MPGirishBapat) December 28, 2020
प्रेम नसलं तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असं म्हणत खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. यावेळी बापट यांच्यासह भाजप नगरसेवक, कार्यकर्ते यांचा मोठा ताफाच काँग्रेस भवनामध्ये दाखल झाला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांचं स्वागत केलं. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्वांनी मनसोक्त दिलखुलासपणे गप्पा मारल्या.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- ‘संजय राऊतांनी कंपाउंडरऐवजी डॉक्टरांकडून औषधे घेऊन मनस्थिती ठीक करावी’
- ‘कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ?’
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
