🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन हे दोन महिने उलटून देखील सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये कृषी कायद्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये या आंदोलनामुळे परिस्थिती अधिक चिघळत आहे. तर, विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनात देखील या आंदोलनाचे पडसाद उमटत असून केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याच दरम्यान, राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंग्रज काळातील एका अदनपालांचा दाखल दिला आहे.
मुजोर ब्रिटीश सरकारलाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले असल्याचे सांगत शेतकऱ्यांमध्ये किती ताकद असते याची मोदी सरकारला आठवण करुन दिली आहे. गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘१९०० ते १९०६ दरम्यान ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात तीन कायदे लागू करण्यात आले होते. पंजाब लँड वसाहत अधिनियम१९००, अधिनियम १९०६ आणि वसाहती अधिनियम १९०६ या तीन कायद्यांमध्ये जमीनीची मालकी ब्रिटीश सरकारकडे येणार होती. यामुळे शेतकरी आपल्या अधिकारापासून वंचित राहणार होते.’
‘यामुळे १९०७ मध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आणि त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व सरकार अजितसिंग, (सरदार भगतसिंग यांचे मोठे बंधू) किशनसिंग जी, (भगतसिंग यांचे वडील) करत होते. यावेळी “पगड़ी संभाल जटा पगड़ी संभाल… सारे जग दा पेट भरे तूं, अन्नदाता कहलाए तूं..” हे गाणं गाजलं होतं. यामुळेच शेतकरी अधिक संघटित झाले व आंदोलन उभे राहिले होते.’
‘यानंतर सरकारने त्या विधेयकात दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आणि काही सुधारणा केल्या. मात्र, गुजरांवाला, लाहोर आणि इतरत्र जोरदार आंदोलन झाले. त्यानंतर तिन्ही बिले ब्रिटिश सरकारला परत घ्यावी लागली.’ अशी आठवण त्यांनी करून देत एकप्रकारे मोदी सरकारला इशाराच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
- परभणीत एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 12,500 लंपास; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
- ‘एखाद्या पराक्रमी योद्ध्याप्रमाणे मुंडेंचं स्वागत होतंय, त्यांचं स्वागत करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
