दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाच्या व्यतिरिक्त दिल्लीत आज एमएसपी गॅरंटी मोर्चा या नवीन शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. एमएसपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी या नवीन संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे नाव एमएसपी गॅरंटी मोर्चा असे ठेवण्यात आले आहे. या बैठकीला माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शेट्टी यांनी या नवीन संघटनेखाली देशभरातील संघटना एमएसपीच्या मागणीसाठी एकत्र येतील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
“एमएसपी गॅरंटी मोर्चा या संघटनेअंतर्गत देशभरातील सर्व शेतकरी संघटना एकवटतील”, असे राजू शेट्टी म्हणाले. तसेच या संघटनेचा स्वतंत्र ध्वज असणार आहे आणि त्या एकाच ध्वजाच्या खाली आगामी काळात आंदोलने, मोर्चे होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

