🕒 1 min read
Ashish Shelar। मुंबई : पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्याने मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अवघ्या दोन जागांसाठी सत्तेचा घास भाजपकडून हिरावला गेला. त्याचा वचपा काढून शिवसेनेकडून सत्ता हिसकावण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्धार आहे. मुंबईत महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा करत शेलार यांनी केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा आशिष शेलार आक्रमक झाले आहेत.
आशिष शेलार म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक म्हणजे देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे आणि दुसरं म्हणजे घराणेशाही उखडून फेकणे. पंतप्रधान मोदी मुंबईकरांच्या मनातलच बोलले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची बजबजपुरी उखडून फेकली पाहिजे. महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे. मी नाही तर माझा पुत्र अशा पद्धतीने पालिकेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे पालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू आणि जिंकू असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. भ्रष्टाचार उखडून फेकणे आणि घराणेशाही संपुष्टात आणून लोकशाही मजबूत करण्यावर आमचा भर असेल. मुंबईकरांना विजयी करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Photos of Dominos | पिझ्झा बेसवर टांगलाय फरशी घासण्याचा ब्रश; डॉमिनोजवर संतापले लोक
- Independence Day | राजकारणातील हेवेदावे, टिका ही तत्वाशी असते व्यक्तीशी नाही – उदय सामंत
- Ambadas Danve । गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा जोरदार हल्लाबोल
- Ajit Pawar | आमदारांची संख्या कमी झाली की हे सरकार गडगडेल – अजित पवार
- Vinayak Mete Death। “दरवेळी चालकच कसे जखमी होत नाहीत?”; दीपाली सय्यद यांचे मेटेंच्या अपघातावर प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
