Share

‘प्रकाश आंबेडकरांची कोणीतरी दिशाभूल केल्याने त्यांनीच युती तोडली’, असदुद्दीन ओवेसींचे स्पष्टीकरण

Published On: 

औरंगाबाद : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एमआयएम लढणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेकांशी युतीचे पर्याय खुले असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही  प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो. त्यांची कोणीतरी दिशाभूल केली. विधानसभेला त्यांनी युती तोडली. आम्ही नाही. पण यापुढील निवडणुकीत युतीचा पर्याय आहे. ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली असे वक्तव्य करतात त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची युती आहे. त्यावरून या दोन पक्षांची विचारधारा कळते. त्यांना फक्त मुस्लिमांची मते हवी असतात. त्यांना मुस्लिमांची काळजी असेल तर त्यांनी ५ टक्के आरक्षण द्यावे. तसेच आता केंद्र सरकारने संविधानात संशोधन करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओवेसींनी केली.

राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. कधी काहीही घडू शकते. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करू, असे म्हणत ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबाबत निवडणूक लढण्याचे एकप्रकारे संकेत दिले. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लग्न करतात हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा खोचक सवालही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!