टीम महाराष्ट्र देशा– माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस उप-राष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन केली. जेटली यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे काल या रुग्णालयात भरती करण्यात आलं. जेटली हे उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे असं नायडू यांनी नंतर ट्विटद्वारे सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती अस्थिर आहे. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. जेटली यांच्यावर सप्टेंबर 2014 मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMS मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.
प्रकृतीच्या अस्थिरतेमुळेचं अरुण जेटली यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीमधून माघार घातली होती. जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. या पत्रात त्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याचे म्हटले होते. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात आपल्या नावाचा विचार करू नये असे त्यांनी म्हटले होते.
कलम ३७० माझ्यामुळे रद्द झाले, राखी सावंतचा दाव
‘लेकर – बाळ उघड्यावर, शोबाजी पायी सरकारनं उपाशी मारालं’
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात येत्या 48 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

