Share

अतिवृष्टीचा आणखी एक बळी, अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या!

Published On: 

नांदेड : बॅंकेचे कर्ज त्यातच अतिवृष्टीने शेतीचे झालेले नुकसान या नैराश्यातून पाटोदा (ता. नायगाव) येथील अंबादास दिगांबर शिंदे (वय ५५) यांनी शनिवारी (ता. १६) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी देशोधडीला लागत असून, अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका बरबडा परिसरातील बहुतांश शेतीला बसला आहे. पाटोदा हे गाव बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये येते.

पाटोदा येथे अंबादास शिंदे यांची शेती असून, त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने अंबादास शिंदे खचून कर्ज कसे फेडावे या नैराश्याने त्यांना ग्रासले होते. शेवटी पाटोदा शिवारातील स्वतःच्या शेताच्या धुऱ्यावरील झाडाला त्यांनी गळफास घेतला. मुलगा संदीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदत जाहीर करण्यात आलेली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच शेतकऱ्याच्या आत्महत्येचे सत्र सुरू असल्याने चिंता वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!