मुंबई: आजपासून (३ मार्च)राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा संकल्प केला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने जोर धरून लावली आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारचे विविध विषयांवरून वस्त्रहरण करणार असल्याचे म्हटले आहे.
“आजपासून २५ मार्च पर्यंत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह अनेक धगधगत्या विषयांवर भाजप वाटमारीफेम ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करणार हे निश्चित.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
आजपासून २५ मार्च पर्यंत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह अनेक धगधगत्या विषयांवर भाजपा वाटमारीफेम ठाकरे सरकारचे वस्त्रहरण करणार हे निश्चित. pic.twitter.com/4rPi2Y0Qel— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2022
दरम्यान काल (२ मार्च ) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला सुनावले. शेतकरी प्रश्न, नवाब मलिक राजीनामा तसेच इतर प्र्श्नांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजचा पहिला दिवस चर्चेत जातो की, भाजप-मविआ सरकारमधील वादात हे लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
“सरकार चांगलं काम करतंय म्हणून अनेकांना अस्वस्थता”, शरद पवारांचा भाजपवर निशाणा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किरीट सोमय्या दिल्ली दरबारी; चर्चांना उधाण
“… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा
- “स्वतःचे तोंड लपवण्यासाठी विरोधक विधिमंडळात गोंधळ घालणार”, संजय राऊतांचा हल्लाबोल


