Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा, तीन नवे चेहरे

Published On: 

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ३ एकदिवसीय आणि टी-२० सामने आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय महिला संघाच्या टी-२० संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौर करणार आहे. तर एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. या दौऱ्यात बीसीसीआयने मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर आणि यस्तीका भाटिया या तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. या तीन खेळाडूंचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण होण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला १९ सप्टेंबर रोजी सुरुवात होईल आणि ११ ऑक्टोबर रोजी अखेरचा सामना खेळवण्यात येईल. दौऱ्याची सुरुवात १९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय मालिकेद्वारे होईल. १९, २२ आणि २४ सप्टेंबर या दिवशी एकदिवसीय सामने खेळवीण्या येईल. तर ३० सप्टेंबरपासुन दौऱ्यातील एकमेव कसोटीला प्रारंभ होईल. टी-२० मालिका १.,९ आणि ११ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!