🕒 1 min read
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. यावर एका वृत्तपत्रात बातमी छापून आली आहे. ही बातमी ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाना साधला आहे.
‘सध्या परिवहन मंत्री गायब आहेत, वाट लावली या माणसाने परिवहन खात्याची’. अशा शब्दात निलेश राणेंनी परबांवर निशाना साधला आहे.
सध्या परिवहन मंत्री गायब आहेत, वाट लावली या माणसाने परिवहन खात्याची. pic.twitter.com/5db1pArabA
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 25, 2021
रत्नागिरी डेपोतील कार्यशाळा कर्मचारी दिनेश पवार यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून ते सेवेत होते. कर्जबाजारीपणा आणि तोकडा पगार यामुळे ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरातील एसटी कर्मचाऱ्यांची ही तीसावी आत्महत्या आहे. यात रत्नागिरी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
होय माझ्या आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार
रत्नागिरीतील एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याचा अभिमान : शाहीन आफ्रिदी
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- ‘फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? याची चौकशी करा’
- ‘मनी लॉन्ड्रिंग करणारा सॅम डिसूझा एनसीबीच्या कार्यालयात’, राऊतांची सीबीआय चौकशीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

