मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील चौकशी सुरू केली. त्याअंतर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केली आहे.
दरम्यान आता अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या आरोपपत्रात त्यांचचं नाव नसल्याची माहिती समोर येतेय. अनिल देशमुखांची अद्याप चौकशीच झालेली नसल्याचं कारण ईडीचे अधिकारी याबाबत खाजगीत बोलताना देत आहेत. या प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही अनिल देशमुख अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझेंसह देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईच्या बारमालकाने हे आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना-भाजप भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याची शक्यता नाही – अमोल मिटकरी
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

