Share

राज्याच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राने लसीकरणात आघाडी घेतली आहे. राज्यातील १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्री सध्या राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतूक करत आहे. मात्र, महाराष्ट्राची क्षमता या पेक्षा जास्त असून सरकारच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरणच होत असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

या संदर्भात केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राज्य सरकारने १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. यावर प्रतिक्रीया देताना उपाध्ये म्हणाले की, ‘महाराष्ट्र क्षमतां आहेच पण आपल्या नाकर्त्या धोरणामुळे रोज सरासरी २ लाख लसीकरण झाल. या संथगतीला इथल सरकार जबाबदार आहे. केंद्र सर्वाधिक लसी पुरवत आहे पण लसीकरणाच नियोजन नीट केल नाही हे वास्तव. आता १ मे पासून तरूणांच्या लसीकरणाच नियोजन काय? लसीकरण मोफत की सशुल्क? किती लसी मागवल्या?’

केवळ लसीकरणाच्या गतीवरच नाही तर पुढील काळातील नियोजनावरही त्यांनी टीका केली आहे. एक मे पासून राज्यातील १८ वर्षापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याचे नियोजन राज्य सरकारने अद्याप केलेले नाही. हे लसीकरण सशुल्क करणार आहे की, निशुल्क या बाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही, या वरुनही त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!