🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीकेचं युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे गोस्वामीवर ही कारवाई सूडबुद्धीने केली गेल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर एक शायरी स्टाईल ट्विट करून भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी याआधी देखील सुशांतसिंह राजपूत मृत्यप्रकारणासह अभिनेत्री कंगना रानौतवरील कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. आता अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर ‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा !’ अशी शायरी ट्विट करून अर्णबचं समर्थन करतानाच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा !
#ArnabGoswami #arnab_goswami #ArnabGoswamiArrested #arnabarrested #maharashtragovt #DeathOfDemocracy https://t.co/KXkTbLP0Jl— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 4, 2020
महत्वाच्या बातम्या
- सुळे ताई याला आणीबाणी म्हणतात, अर्नबच्या अटकेवरून निलेश राणेंचा घणाघात
- बस इतना याद रखना…हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के! – नितेश राणे
- बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक….
- डिसेंबरमध्ये गोव्यात होणार १४वा सनबर्न महोत्सव…
- भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आज दाखल होणार तीन राफेल विमानं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
