अमरावती : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही भागात पडले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराची झालेल्या भागाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती, असेही फडणवीस यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.
त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला.
हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 21, 2021
अमरावतीसह राज्यातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले मोर्चे हे खोट्या माहितीच्या आधारे काढण्यात आले होते. त्रिपुरात जी घटना घडली नाही, त्याचे खोट्या माहितीच्या आधारे भांडवल करण्यात आले. याच खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वनियोजनाशिवाय मोर्चे निघू शकत नाहीत. त्यामुळेच 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चांची चौकशी करावी. सध्या सुरू असलेली कारवाई 13 नोव्हेंबरच्या घटनेवर आधारीत होत आहे. पण दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
In Amravati since morning..
Sharing details LIVE in few minutes.https://t.co/9euWt9ZzFC#Maharashtra pic.twitter.com/yuXWsO7u3A— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 21, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘पब, पार्टी आणि पेग. गुड गोईंग! आघाडी’, अशिष शेलारांची खोचक टीका
- ‘वादग्रस्त बोलतात त्यांना संरक्षण मिळते अन् लगेच पद्मश्री मिळतो’
- एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये- बाळासाहेब थोरात
- असला सैतान मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही- सदाभाऊ खोत
- ‘ही तर मद्य विकास आघाडी’; दारू स्वस्त करण्यावर भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

