🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र अमोल कोल्हेंची बाजू घेतली आहे.
“खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 21, 2022
दरम्यान अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या भूमिकेवरून जितेंद्र आव्हाड म्हणाले, विनय आपटे, शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार.डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- अखेर कालीचरण पोलिसांच्या ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ
- “तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा”, गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
- पंतप्रधान मोदी ठरले आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय नेते; अतुल भातखळकरांनी केले कौतुक
- “दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणात सेवन केल्यास औषधासारखी असते”, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा अजब दावा
- “काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही”, अमर ज्योती विझवण्यावरून राहुल गांधींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
