Share

अमोल कोल्हेंनी विचारांशी गद्दारी केली, चित्रपटावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Kill Gandhi या चित्रपटात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरुन मोठे वादंग उठले आहे. आता संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. नथुरामप्रेमी अमोल कोल्हेंनी विचारांशी गद्दारी केली आहे, चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली आहे.

अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी विरोध केला आहे. तर एक अभिनेता म्हणून नथूरामची भूमिका करण्यात काय गैर आहे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या सर्व गोंधळात अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका होत असून वेगवेगळे आरोप केले जात आहे. आता तर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे, असा आरोप करत चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

अमोल कोल्हे यांनी Why I Kill Gandhi या हिंदी चित्रपटात महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा अभिनय केला आहे. या चित्रपटात नथुरामचे उदात्तीकरण केले जात आहे. या कारणामुळे संभाजी ब्रिगेडने डॉ. अमोल कोल्हेंविरोधात कठोर भूमिका घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. “आम्हाला नथुराम नकोय. नथुरामप्रेमी डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा Why I Kill Gandhi हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये. त्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी. आम्हाला नथुराम नकोय,” असे संतोष शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!