🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या पोस्ट मुळे नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी अमिताभ बच्चन एका कवितेमुळे चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केलेली एक कविता चोरीची असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला होता. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना त्याचे क्रेडिट दिले नाही, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
त्यानंतर टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केलं होतं. या महिलेच्या तक्रारीनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागितली आहे. या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट केलंय.
अमिताभ बच्चन ट्विट मध्ये म्हणाले, ‘या ट्विटचं श्रेय टीशा अग्रवाल यांनी दिलं पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला ठावूक नव्हतं. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती. मला माफ करा’
त्या महिलेची माफी मागितल्यानंतर सध्या महानायक अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
T 3765 – "थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध ख़ुशियों का
*थोड़ी पत्तियां ख़यालों की..*" …more ..this tweet credit should go to @TishaAgarwal , I was not aware of its origin .. someone sent it to me , I thought it to be good and posted ..
apologies ???????? pic.twitter.com/6YAOKXdIxe— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 27, 2020
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- खुशखबर ! अॅमेझॉन च्या ‘मेगा सॅलरी डेज’ सेल मध्ये ‘या’ वस्तूंवर मिळणार ५०% सूट
- ‘ईडीची नोटीस आली की महाविकास आघाडीचे नेते चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात’
- येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा – अनिल देशमुख
- ‘ईडी कार्यालयात आज हजर होणार होतोच मात्र कोरोना सदृश लक्षणांमुळे विश्रांतीची गरज आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
