🕒 1 min read
मुंबई: आज १९ जूनरोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान यानिमित्त भाजप आमदार अमित साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे म्हटले आहे.
“स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे लावण्यात येत आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच दृष्टीकोण सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का? असा सवाल अमित साटम यांनी केला आहे.
गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळे लागले आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली. एकीकडे सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगते तर दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरत आहे. असे अमित साटम यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवारांनी पाठींबा द्यावा, मी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो – अभिजित बिचुकले
- काश्मिरी पंडितांबाबत वादग्रस्त विधानावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण ; म्हणाली…
- श्रीरामांना ते मान्य झाले असते काय? संजय राऊतांचा सवाल
- “तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणारी…”, बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर निशाणा
- Agnipath Scheme: “महाराष्ट्रात एस.टी. आंदोलन चिघळवणारे आता…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
