अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
१४ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर उठवावी अशी विनंती अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना निवेदनातून केली आहे.
खा.विखे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी जेणेकरून कांद्याची निर्यात व कांद्याचा भाव नियंत्रणात राहील. अशा प्रकारे तोडगा काढून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती विखे यांनी निवेदनात केली आहे.
तसेच केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेला एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून कांद्याच्या किमती स्थिर कराव्यात. मात्र हा कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी खा.सुजय विखे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आज राज्यातील पहिला जिल्हा बंद, सरकारचं घालणार श्राद्ध
- मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन, मनसेसैनिकांनी लोकलने प्रवास केलाच…
- कृषी विधेयकाविरोधात शेतकरी उतरणार रस्त्यावर, २५ तारखेला देशव्यापी आंदोलनाची हाक
- वाचाळ कंगना पुन्हा बरळली, शेतकऱ्यांची तुलना केली दहशतवाद्यांशी
- सरकार पाडण्याची क्षमता अधिकाऱ्यांच्यात नाही, ‘ते’ उगवत्या सूर्याला नमस्कार करतात! सामनातून टीकास्त्र


