Share

कोकणातील पूरस्थितीत सर्व पालकमंत्री गायब होते, तीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे- भाजपाची टीका

Published On: 

मुंबई : कोकणात पूर आला तेव्हा सर्व पालकमंत्री गायब झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे. निकम्मे पालकमंत्री, बेशरम सरकार अशी टीका महाविकास आघाडीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत. मात्र पालकमंत्री कुठेच पाहणी करताना दिसत नाहीत. तीन आठवड्यापूर्वी मराठवाड्यातील जवळपास पावने चारशे महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, या नुकसानीचे तातडीने पंचनामे होणे अपेक्षीत असताना पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी सुस्त झाले आहेत. पालकमंत्र्यांनी तशा सुचनाच दिल्या नाहीत त्यामुळे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. या बाबतचा साम टिव्हीने केलेले स्पॉट रिर्पोट अतुल भातखळकरांनी शेअर करत टिका केली आहे.

सध्या सोयाबीन काढणीस आलेले आहे, अनेक शेतकऱ्यांनी कापणी करुन शेतातच सोयाबीन ठेवले आहे, या सोयाबीनला सध्या अंकुर फुटल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. तसेच कपासी, बाजरी, मका, ऊस आदी खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत असून प्रशासन ढिम्म झाले आहे, अशी टिका शेतकऱ्यांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!