🕒 1 min read
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार नेहमी चालू घडामोडींवर त्याचे मत स्पष्टपणे मांडत असतो. अमानाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाल्याची घटना शुक्रवारी (८जुलै) घडली. या घटनेमध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दुःख देखील व्यक्त केले. यामध्ये अक्षय कुमारने देखील दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय कुमारने ट्विट शेअर करत लिहिले की, “अमरनाथ मंदिराच्या पवित्र गुहेजवळील बालटाल येथे ढगफुटीमुळे जीवितहानी झाली. हे ऐकून फारच दुःख झालं. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”
Deeply pained at the loss of lives at Baltal near the holy cave at #Amarnath shrine after the cloudburst. Prayers for everyone’s peace and safety ????????
— Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2022
दरम्यान अमरनाथ गुहेच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले होते. तर पावसामुळे येथील परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या घटनेमध्ये मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
