मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर नेते देखील उपस्थित असतील. चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावरून शिवसेना आणि राणेँमध्ये श्रेयवाद देखील चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला आहे.
या विमानतळाच्या उद्घाटनावरून आज मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, ‘सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं काम आता पुर्ण झालंय. या चिपी विमानतळावर आता एक पुस्तकचं लिहायला पाहिजे, किती टर्म चिपी चिपी चाललं. पण चिपी काही पुर्ण होईना. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा ९ तारखेला सुरु होत आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आम्ही पण मुख्यमंत्र्याबरोबर जात आहोत. आताच त्यांना सांगितल विमानात मला जागा ठेवा,’ अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. यासोबतच, ‘विमानसेवेचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होईल. गोव्याकडे जाणारे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात कोकणाकडे वळतील,’ असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई; महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे
- मुख्यमंत्र्यांची घोषणा! डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये घेणार कॅबिनेट बैठक
- भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा अहंकार, गर्दीच्या कार्यक्रमांवरून एसपींना भेटणार-पंकजा मुंडे
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

