बीड : राज्यात कोरोनाची दुसऱ्या लाट नियंत्रणात येत असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण काहीसे चिंताजनक दिसून येत आहे. या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीचा दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत.
बीड जिल्हा कोविड-19 आणि खरीप हंगामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. ‘कोविड संकटाबरोबरच जिल्ह्यातील ऊसतोड मजूर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासनाने संत भगवानबाबा वसतीगृह योजनेला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे 20 निवासी वसतीगृह मंजूर झाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गाळप होणाऱ्या उसा मागे प्रतिटन 10 रुपये निधी आकारला जाऊन तो महामंडळास दिला जाईल’ असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
बीड जिल्ह्यातील कोविड-19 सद्यस्थितीचा आढावा, खरीप हंगाम 21 चा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आरोग्यमंत्री @rajeshtope11 भैय्या यांच्या उपस्थितीत बीड येथे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. (1/5) pic.twitter.com/ZxYDZFXJOC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 18, 2021
पीक कर्ज वाटपसाठी १५ जुलै ही अंतिम मुदत
महाबीजकडून उपलब्ध होणारे बियाणे मर्यादित आहे. परंतु राज्य शासन इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी उपाय करीत आहे. खतांचे पुरेशी उपलब्धता करण्यात आली असून पिक कर्ज वाटपासाठी बँकांना 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नवनीत राणा यांची सुप्रीम कोर्टात धाव, ‘माझे जात प्रमाणपत्र वैधच, विजय सत्याचाच होणार!’
- पवारांच्या लेकीची ‘पॉवर’बाज कामगिरी! लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळे अव्वल
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- ‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक


