Share

Ajit Pawar | “कित्येक दिवस तर ते दोघेच मंत्रीमंडळात होते…”; अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला

Published On: 

मुंबई :  वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर आरोप करत आहेत की, हा प्रकल्प राज्यातून सत्ताधाऱ्यांकडून गेला. तर सत्ताधारी म्हणत आहेत की, महाविकास आघाडी सरकारमुळे गेला. अशातच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच सुनावलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

हे धादांत खोटं आहे. वेदांता कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन म्हणजे 90 दिवस. काही कमी नाहीयेत. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

पुढे बोलताना पवार असंही म्हणाले की, ते तर म्हणत होते की आम्ही दोघं खंबीर आहोत. म्हणूनच अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. ते काय सांगतायत? तीन तीन महिने तुम्हाला पालकमंत्री नेमता येत नाहीत. इतकी कामं, इतक्या कमिट्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. खूप गोष्टी असतात. त्यावर काही करत नाहीत आणि आम्ही काही बोललो की हे असंच बोलतात वगैरे सांगतात.

तसेच अजित पवार म्हणाले की, आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलतो. यावरून लक्ष बाजूला जाण्यासाठी ते लोक तिसरंच काहीतरी काढताता, असा आरोपही अजित पवार यांनी विरोधकांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!