Share

ओमायक्रॉनचा संसर्ग आणि राज्यातील शाळा यावर अजित पवारांचं मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

पुणे: जगभरात सध्या ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. भारतातही ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत होता आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, मात्र ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता राज्यातील शाळा सुरू राहणार की बंद करणार यावर सध्या विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. त्याच सोबत लसीकरण देखील अजून सगळ्यांचे झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत अजून कुठला ठोस निर्णय घेत नाहीये. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलं आहे. ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली असून ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा अंदाज घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ. स्थानिक लोकांमध्ये शाळेवरून निर्णय घेताना वाद होतात. त्यामुळे राज्य स्तरावरच याबाबत निर्णय घेणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!