Share

श्रीसंत नंतर स्पॉट फिक्सींग प्रकरणातील मुंबईचा ‘हा’ खेळाडू पुनरागमनाच्या मार्गावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सींग प्रकरणातील भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीसंतची बंदी काही दिवसापुर्वी हटवीण्यात आली. यानंतर श्रीसंतने मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुश्ताक अली स्पर्धेत पुनरागमन केले होते. या स्पर्धेत तो केरळ संघाकडुन खेळत होता.

श्रीसंतनतर याच प्रकरणातील दोषी मुंबईचा खेळाडू अंकित चव्हाणची बंदी हटवली असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अंकितने स्वत: याचा खुलासा केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल डीके जैन यांनीही आपली शिक्षा कमी करून ७ वर्षे केली असा दावा अंकित चव्हाणने केला आहे. मात्र अद्यापही यासंदर्भात बीसीसीआयकडून अधिकृत पत्र अंकितला मिळाले नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अंकित म्हणाला की, ‘लोकपाल जैन महिनाभरापूर्वी ३ मे रोजी हा निर्णय दिला होता. यामुळे माझ्यावर लागु असलेली बंदी सप्टेंबर २०२० मध्येच संपली आहे.’

या संदर्भात अंकितने बीसीसीआयला पत्र लिहीले असल्याचेही सांगितले आहे. मात्र अद्यापही बीसीसीआयने काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने एमसीएकडे मदत मागीतली. येत्या ११ जुन रोजी मुंबई क्रिकेट असोसीएशन म्हणजे एमसीएची बैठक होणार आहे. या बैठकीत हा विषय मांडला जाण्याची शक्यता आहे. २०१३ आयपीएल हगांमात स्पॉट फिक्सींग प्रकरणी बीसीसीआयने एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!