Share

४५ वर्षांनी देशाचा गरीब श्रेणीत पुन्हा समावेश, मोदींनी करून दाखवलं; काँग्रेसची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले आहे. या रोगावर ठोस उपचार नसल्याने सुरुवातीला सर्व देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. भारतात देखील मार्च महिन्यापासून कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.

या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून आता पुन्हा एका देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दरम्यान, रोजगार गमावल्याने अनेकांच्या उदर्निवाहाचा प्रश्न देशात गंभीर झाल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गरिबीची समस्या देशात वेगाने पसरत असून Pew Research Center च्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे देशात गरिबांची संख्या ६ कोटींवरून थेट १३ कोटी चाळीस लाख लाख इतकी झाली आहे.

म्हणजेच गेल्या ३६५ दिवसांत गरिबीची संख्या दुप्पटीहून अधिक झाली आहे. यामुळे ४५ वर्षांनी भारताचा सामूहिक गरिबीच्या श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदीजींनी करून दाखवलं…अच्छे दिन’ असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!