Share

नांदेड विभाग मध्य रेल्वेस जोडा; खासदार फौजिया खान

Published On: 

परभणी : वर्षानूवर्षापासून दक्षिण मध्यरेल्वे विभागात पूर्णतः दूर्लक्षित ठरलेल्या नांदेड विभागास तातडीने मध्य रेल्वे विभागास जोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार  फौजिया खान यांनी बुधवारी राज्यसभेत केली.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड विभागावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. सर्वाधिक उत्पन्न देऊन देखील या विभागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने दक्षिण मध्यरेल्वे विभागामाव्दारे कमी आर्थिक तरतुद होताना दिसते. त्याचा परिणाम नांदेड विभाग रेल्वे विकासाच्या कामापासून कोसोदूर राहिल्याची खंत खान यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. काचीगुडा – मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तसेच विद्युतीकरणाच्या कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही. मराठवाड्यातून मुंबईकडे धावणार्‍या रेल्वेसुध्दा खुपच अपुऱ्या आहेत.

सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाश्यांकरिता पॅसेंजर गाड्याही नाहीत, असेही या वेळी खान यांनी सांगितले. तर जनशताब्दी एक्स्प्रेस जालनाहून नांदेडपर्यंत आणावी, अशी मागणी केली. तसेच रेल्वे बोर्डाने रेल्वेचे खासगीकरण करण्याचे सुरू केलेले प्रयत्न तातडीने थांबवावेत, अशीही मागणी खान यांनी राज्यसभेत केली आहे. जनशताब्दी एक्सप्रेस जर नांदेडहून सोडली तर खुप मोठ्या पल्ल्याची गाडी संपुर्ण मराठवाड्याला जोडल्या जाइल आणि त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी सोपी, सुलभ आणि जलद गाडी मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, परळी (बीड)  नांदेड या जिल्हाला याचा फायदा देखील होणार असल्याची मागणी देखील खासदार खान यांनी या वेळी राज्यसभेमध्ये केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!