Share

महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून

Published On: 

नांदेड : महावितरण सध्या गावा गावात ज्या बळीराजाची वीज जोडणी कपात आहे, तोच बळीराजा आज वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणच्या मदतीला धावला आहे. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत सवलत देणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास नांदेड परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देगलूर विभागातील १४७ कृषिपंप ग्राहकांनी २३ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा करुन २२ लाख रूपयांची सवलत मिळवली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्नपुर्ती करणारे हे अभियान असून थकबाकीदार शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत थकबाकीमुक्त व्हावे. नवीन वीज जोडणीसाठीही कृषी ऊर्जा अभियानामध्ये तरतूद असून एकूणच शेतकरी हिताचे हे अभियान असल्याचे सांगितल्या जात आहे.

या अभियानात कृषिपंपधारकांकडून वसूल होणाऱ्या वीजबिलाच्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणही कृषीपंपधारकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!