🕒 1 min read
महाराष्ट्र देशा टीम : पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या प्रकरणावर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा ट्विट करत घटनेचा निषेध व्यक्त केला. ‘पालघरमध्ये तीन साधूंच्या हत्येची घटना अत्यंत भयानक व दु:खद आहे. त्या घटनेचा व्हिडीओ मी शेवटपर्यंत पाहू शकत नाही. हे काय होतंय? देशात काय घडतंय? हा मानवतेचा घोर अपराध आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
HORRIFIED AND DEEPLY DEEPLY SADDENED at the #PalgharMobLynching of three sadhus. Couldn’t watch the video till the end. ये क्या हो रहा है? ये क्यों हो रहा है। मानवता का जघन्य अपराध है ये।
— Anupam Kher (@AnupamPKher) April 19, 2020
अभिनेता फरहान अख्तरनेही या घटनेचा निषेध करत, देशात झुंडशाहीला थारा नाही दिला गेला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. दरम्यान या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.


