🕒 1 min read
ठाणे- ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी सहा महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.
Anant Karmuse Engineer Kidnapping & Assault by Thackeray Sarkar Minister Jitendra Awhad, 6 months completed. today 3 Constable arrested, in all 9 arrested till now. We Want action against Minister on whose instructions this incident happened @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 5, 2020
विशेष म्हणजे मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. दरम्यान,माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला थेट सवाल उपस्थित केले आहे. सोमय्या म्हणाले,ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या १५ पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचे अपहरण केले, त्यानंतर त्याला घरी आणले आणि मारहाण केली. ठाकरे सरकारने याप्रकरणी सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? असं म्हटलं आहे.
ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणात तिघा पोलिस शिपायांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?
- मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे : रावसाहेब दानवे
- पुणे : दोन लाख विद्यार्थी ऑनलाईन तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन अंतिम वर्षाची परीक्षा देणार
- ‘अच्छे दिन’चं गाजर दाखवून सत्तेत आलेले आज हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत
- … तोपर्यंत राज्यातील कॉलेजेस सुरु होणार नाहीत – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
