औरंगाबाद : कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात रिक्षा व इतर प्रवासी वाहनांचे थकीत बँक हफ्ते वसुली करण्यासाठी गोरगरीब मालक व चालक यांना नाहकत्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या खाजगी रिकव्हरी एजंटना त्वरीत पाबंद करण्यात यावे अशी तक्रार खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे चालक व मालक यांनी केली होती. त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्राव्दारे खाजगी बँक व फायनान्स कंपन्यांची बैठक घेवुन संबंधितांना पाबंद करण्याचे सुचित केले.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेशी निगडीत उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. इतर सर्व प्रकारचे कामधंदे, उद्योग व पर्यटन स्थळे बंद असल्याने रिक्षा व इतर प्रवासी वाहने चालविणाऱ्या गोरगरीब मालक व चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येवुन आर्थिक परिस्थिती हलाखिची झालेली आहे.
अशा बिकट परिस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँका व फायनान्स कंपन्यांनी बँकेचे हफ्ते वसुली करण्यासाठी बाउंन्सर, गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोरगरीब मालक व चालक यांच्याकडे सकाळी व मध्यरात्रीच्या वेळी पाठवत आहे. सदरील रिकव्हरी एजेंट गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते वसुली करण्यासाठी बळजबरी करणे, दादागिरी करुन घरातील व्यक्तींना व महिलांना धमकावणे तसेच सर्रासपणे अर्वाच्च भाषेचा वापर करुन आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम करत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले आहे. गोरगरीब चालक व मालक यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँक व फायनान्स कंपन्यांची संयुक्त बैठक घेवुन नाहकत्रास देणाऱ्या सर्व संबंधितांविरुध्द उचित कायदेशिर कार्यवाही करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
कोरोनाच्या काळात रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहनांचे हफ्ते वसुली थांबली नाही तर सर्व गोरगरीब चालक व मालक हे त्यांचे जवळील वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहे. वाहने जमा झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व चालक व मालक यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहसाठी दररोज प्रत्येकी १००० रुपये द्यावे अन्यथा सर्वांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’


