🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय चांगलंच अस्थिर झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. सगळ्या पक्षातील राजकीय नेते एकमेकांसोबत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळत आहेत. त्यातही कोण कोणावर आरोप करेल काही सांगता येत नाही. अशातच काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मागणी केली आहे.
तुम्हाला आठवत असेल, राज्यातील सत्ता बदलायच्याआधी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले. परंतू चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रसाद लाड विजयी यांचा विजय झाला होता. काँग्रेस पक्षाची मत फुटल्याचं या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आलं.
त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत पक्षादेश धुडकावून विरोधकांना मत देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. ही गंभीर घटना विधिमंडळ पक्षात घडली आहे. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची नावंही समोर यायला हवी, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
तसेच, असा बेशिस्तपणे पक्ष चालणार असेल तर एखाद्या महत्वाच्या वेळी काही सदस्य पक्षाला अडचणीत आणतील, अशी चिंताही व्यक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Monsoon session | “ईडीच्या माध्यमातून का असेना पण नवीन सरकार आलंय, आता तरी…”; शशिकांत शिंदेची मागणी
- Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी, उद्धव ठाकरेंची ठाण्यातून मेगा रॅली
- Assembly Session 2022 | एकनाथ शिंदे नाव शिवसेनेचे घेतात अन् कार्यक्रम भाजपचा राबवतात – भास्कर जाधव
- Raj Thackeray | अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा- राज ठाकरे
- Eknath Shinde । देवेंद्रजींनी तुम्हाला प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली, चालू विधानसभेत शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
