Share

रेल्वेत विनाकारण साखळी ओढून रेल्वे थांबवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा!

Published On: 

औरंगाबाद : रेल्वे स्थानकावर किंवा धावत्या रेल्वेत साखळी ओढून रेल्वे थांबवू नका तसेच विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करू नका. अशा सूचना वारंवार देऊन काहीजण या सुचनाकडे पाठ फिरवित आहेत. अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी आरपीएफच्या वतीने बुधवारी (दि.१२) सकाळपासून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामध्ये दुपारपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली असल्याची माहिती आरपीएफचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावर नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करू नका. रेल्वे विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करू अशा सूचना वारंवार देण्यात येतात. परंतु तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा लोकांवर आरपीएफच्या वतीने कारवाई केली जाते. आतापर्यंत अनेकांवर कारवाई करूनही काहीजण पुन्हा नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बुधवारी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

त्यात विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणारे दोन जण आढळून आले. तर जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये साखळी ओढताना एकजण आढळून आला. त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले आहे. याशिवाय  रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंग मध्ये दोन रिक्षा आढळून आल्या त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उचलला असून रिक्षा देखील ताब्यात घेतल्या आहेत.

ही कारवाई दिवसभर करण्यात आली. याशिवाय वारंवार सूचना देऊनही रेल्वे विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसेल तर अशा लोकांवर कारवाई केली जाईल. तसेच काहीजण रेल्वे पटरीवर बाईक आणतात, विनाकारण फिरतात अशा लोकांवर देखील कारवाई केली जाईल असेही आरपीएफच्या वतीने स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वे विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!