Share

नीती आयोगाच्या सूचनेनंतर विमानतळ विस्तारीकरणाला गती, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आगामी काळात औरंगाबाद शहराचा विकासाचा वेग लक्षात घेता औद्योगिक विकासाला साह्यभूत ठरणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेल्या चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या ठिकाणी मोजणी झालेल्या जागांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.

औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १८२ हेक्टर जमिन प्रस्तावित असून याचे भूसंपादनाची प्रक्रियेसाठी मोजणी व सर्वेक्षण सुरू आहे. भारतीय विमान प्राधिकरणाच्या औरंगाबाद कार्यकक्षेतील जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आढावा घेतला. गावठाण व शहर हद्दीत असलेल्या जमिनीच्या संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी तसेच सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना यावेळी निर्देशित केले. त्याचप्रमाणे प्रकाश नगर, मूर्तीजापूर, कामगार कॉलनी, चिकलठाणा, येथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांना घराच्या सुविधेबाबतही जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले. विमानतळ विस्तारीकरणात आवश्यक असलेल्या व मोजणी झालेल्या जमिनीवर योग्य ते मार्किंग करुन खांब अथवा खूणा दिसतील अशा रंगात आणि सदरील जमिन विमानतळ प्राधिकरणाची आहे, अशा संदेशाचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या भेटीदरम्यान विमानतळ प्राधिकरणाचे साळवे यांनी औरंगाबाद शहरातील विमानतळ तयार झाल्यापासून यामध्ये झालेले बदल व पार्श्वभूमी या विषयी माहिती दिली. तसेच तांत्रिक पथकाने विमानतळाच्या नकाशाप्रमाणे कोणकोणत्या बाबी प्रस्तावित आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!