Share

“सरकार गेल्यापासून फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये, विरोधी पक्षाच्या वागण्यात…’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Published On: 

चंद्रपूर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) हे काल(१३ फेब्रु.) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलत असतांना आदित्य यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच सरकार गेल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) फ्रस्ट्रेशनमध्ये आले असून विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसते, असेही आदित्य म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आले असून विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. परंतु, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही’, असे ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, या दौऱ्यावेळी आदित्य यांनी शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गोंडकालीन १२ किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली. तद्पश्चात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीतही सहभाग घेतला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!