मुंबई – भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी काल नाशिक येथे राज्य सरकारचा महा वसुली आघाडी असा उल्लेख करत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत होळी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला म्हणून हिरण्यकशिपु या राक्षसाची बहिण ‘होलिका’ अग्नीत जळून भस्मसात झाली म्हणुनच आपण ‘होळी’ साजरी करतो. आज राज्यात सुद्धा हेच चित्र सुरु आहे.यावेळी भाजपा नाशिक ग्रामीण युवा मोर्चा संघटन सरचिटणीस समीर काळे, उपाध्यक्ष राहुल बोराडे, चिटणीस पंकज मिश्रा, नरेश कोसरे, सदस्य संतोष मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते
भोसले म्हणाले,हे राज्यातलं ठाकरे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर अत्याचार , साधु-संतांची हत्या, त्यांची निंदा-नालस्ती आणि जनतेकडून खंडणी वसूल करत आहे. आणि म्हणून आज या होळीच्या पवित्र दिवशी या सरकारचा निषेध म्हणून आम्ही अग्नी देवतेला प्रार्थना केली की आपल्या सत्तेचा आणि शक्तीचा दुरुपयोग करणारं हे राज्यातलं महा वसुली आघाडी सरकार लवकरात लवकर अग्नीत जळून भस्मसात होऊ दे आणि महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे असं त्यांनी म्हटले आहे.
हिरण्यकश्यपूची दृष्ट बहीण होलिका अग्नीत भस्म झाली. वाईट वृत्तीचा नाश झाला म्हणून आपण होळी साजरी करतो. राज्य सरकारच्या वाईट प्रवृत्तीचाही नाश व्हावा म्हणून सरकारच्या निषेधार्थ आज भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांनी अग्नी देवतेला प्रार्थना केली. pic.twitter.com/DHibuuETWh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा


