Share

साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत

Published On: 

इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.

साऊथम्पटनमधील परिस्थितीचा विचार केला तर या पिचवर 250 रनचा स्कोअर देखील पुरेसा असेल असं भाकित टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी केले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत असे भाकीत केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला प्रत्येक सेशनमध्ये चांगली बॅटींग करावी लागेल. आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरलो तर या परिस्थितीमध्ये 250 रन देखील पुरेसे असतील.’ यावेळी त्यांनी रोहित शर्मा आणि शुभमन गिल प्रशंसा केली आहे. ‘विराट आणि अजिंक्यनं चांगली बॅटींग केली. पण मी रोहित आणि शुभमनला अधिक श्रेय देईल. त्यांनी कठिण परिस्थितीमध्ये संयम दाखवला. आम्ही दिवसाचा शेवट चांगला केला आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!