अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली.
सामन्यासह टी२० मालिकाही गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात लाखो भारतीय चाहत्यांची मने जिंकणारे वक्तव्य केले. मॉर्गन म्हणाला की, ‘त्यांच्या घरच्या मैदानात बळकट अशा भारतीय संघाचा खेळण्याचा अनुभव खूपच प्रभावी होता. आज शानदार असा एक सामना पाहायला आणि खेळायला मिळाला. सामन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने आमचा पराभव केला आहे. त्यामुळे ते या विजयाचे हक्कदार आहेत. तथापि, आम्ही या मालिकेत बरेच चांगले क्रिकेटदेखील खेळले.’
‘या मालिकेनंतर मागे वळून पाहताना अनेक सकारात्मक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पूर्वीच्या सामन्यांमध्ये बर्याचदा असे दिसून आले की, मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. त्यामुळे मालिकेतील हे क्षण आमच्यासाठी खूपच भारी ठरले,’ असे मॉर्गनने पुढे म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रांनी चौकशी केली तर फटक्यांची माळ लागेल, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
- जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट; भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

