🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर औरंगाबाद वाहतूक शाखेने एक नविन उपाय शोधला आहे. शहर वाहतूक शाखेने खासगी ट्रॅव्हल्सला सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत शहरात येण्यास बंदी घातली आहे. या नियमाचा जर कुणी भंग केला तर कडक कारवाई केली जाईल असेही वाहतूक शाखेने सांगितले आहे. तसेच परवानगी असलेल्या कालावधीत ४० किमी प्रतितास ही वेगमर्यादाही ठरवून दिली आहे.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही वाहनचालकासाठी आणि वाहतूक शाखेसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरली आहे. सध्या शहरातील मुख्य रस्ता जालना रोड च्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी काही दिवस राहणार आहे. तसेच अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून वाहतुक शाखेने या वाहनावर कारवाई न करता खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसला सकाळी सात ते रात्री आकरा या वेळेत शहरात प्रवेशबंदी केली आहे. या नविन नियमानूसार दिवसा या बसेसला शहरात प्रवेश हवा असेल तर त्यांना रितसर अर्ज करुन परवानगी घ्यावी लागेल, असे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले.
शहरात दिवसभरात प्रचंड वाहतुक कोंडी असते, या दरम्यान जर एखादे मोठे प्रवासी वाहन शहरात आले तर आपघात होण्याची शक्यता असते. नविन बदलानुसार आता शहरात पुणे-अहमदनगर, धुळे-वैजापूरकडून येणाऱ्या बस नगर नाका, लोखंडी पूल, बाबा पेट्रोल पंपमार्गे पंचवटी व परत नगर नाकापासून पुढे जातील, तर पैठणकडून येणाऱ्या बसेस लिंकरोड, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपासवरून संग्रामनगर उड्डाणपूल मार्गे शहानूरमियाँ दर्गा चौकापर्यंत येतील. आणि जालनाकडून येणाऱ्या बसेस केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड बायपास, गोदावरी टी मार्गे शहानूरमियां दर्गा चौकात येतील. जळगावकडून येणाऱ्या बसेस हर्सूल टी, जळगाव टी, चिकलठाणा, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड बायपासमार्गे पुढे जातील.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय?”
- औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलनिमित्त शॉर्टफिल्म स्पर्धेचं आयोजन
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


