औरंंगाबाद : वडिलोपार्जित शेतीच्या व्यवहारातील पैसे न देता उलट व्याजाने दिलेल्या पैशांवरून आर्थिक अडचणीत आणून मानसिक त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजीनगरात घडली होती. नागनाथ तुकाराम कलालडे (रा.शिवाजीनगर, गारखेडा परिसर) असे मयताचे नाव आहे.
मयत नागनाथ कालालडे यांच्या वडिलोपार्जित शेतीच्या व्यवहारातील पैसे प्रकाश कटारे, अनिल होगे पाटील, अशोक सुर्यवंशी यांच्याकडे बाकी होते. त्यामुळे नागनाथ कालालडे यांनी पैशासाठी तकादा लावला असता त्यांनी कलालडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच सुनील घंटे यांच्याकडून मयत कलालडे यांनी ५० हजार रूपये व्याजाने घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे परत दिल्यावरही सुनील घंटे हे एक लाख रूपये दे म्हणून नेहमी त्रास देत होते. तसेच घंटे यांनी कलालडे यांच्या नावावर एका दुकानातून बेड खरेदी करून त्याचे देखील पैसे दिले नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या नागनाथ कलालडे यांनी ३१ जानेवारी रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती.
याप्रकरणी नागनाथ कलालडे यांचा मुलगा शिवाजी कलालडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल होगे पाटील, अशोक सुर्यवंशी, अनिल घंटे, सुनील घंटे यांच्यासह एका महिलेविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

