नांदेड: शहरात एकीकडे कोरोनामुळे संचारबंदी असताना नागरिकांवर सायबर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, शहरातील साईनगर भागातील फळ व्यावसायिक तरुणाला २५ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून इन्शुरन्स काढण्यासाठी ५० हजार रुपये बँक खात्यात टाकण्यास सांगितले. परंतु कर्ज मंजूर न करता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याची घटना १७ फेब्रुवारी २०२१ पासून आजपर्यंत घडली.
साईनगर भागातील फळ विक्रेता तरुण अब्दूल मुबान अब्दुल मजीद यास फेब्रुवारी महिन्यात बजाज फायनान्सच्या नावाने २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचा फोन आला. त्याकरीता तुम्हाला इन्शुरन्स काढण्यासाठी ५० हजार रुपये लागतील, असे सांगितले. फिर्यादीने पंजाब नॅशनल बँक खात्यात व कॅनरा बँकेचे खात्यात वेगवेगळ्या तारखेला तीन वेळा पन्नास हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी भरले.
कर्ज मंजूर न करता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणूक केली. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात ८०/२१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कृष्णा काळे अधिक तपास करीत आहेत. अशा घटनांमुळे नागरिकाना आर्थिक फटका बसत आहे, संचारबंदीमुळे आधीच काम गेले आहे, त्यात अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- वेळीच काँग्रेस नेत्यांचे सल्ले ऐकले असते तर देशाचे स्मशान झाले नसते – पटोले
- संचारबंदीनंतर लस न घेता फिरल्यास पाचशे रुपयांचा दंड!
- मौलाना वहीदुद्दीन यांचे निधन; संघ, मोदींनी व्यक्त केल्या संवेदना
- उस्मानाबाद जिल्ह्यात बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा
- महाराष्ट्राच्या मदतीसाठी गडकरींचा पुन्हा पुढाकार; आंध्र प्रदेशकडून मिळणार ३०० व्हेंटीलेटर्स !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
