Share

कर्जतमध्ये महायुतीची लाट, पाचपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीने विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. कर्जत तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. पाचपैकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला आहे.

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 13 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेकडे आले असून कर्जत तालुक्यातील उमरोली आणि जामरूख ग्रामपंचायतीवर शिवसेनेकडे आल्या आहेत. यामुळे कर्जत तालुक्यात आज भगवं वादळ आल्याचं चित्र यानिमित्ताने पाहायला मिळालं आहे.

कर्जत तालुक्यातील शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्याचे काम गेल्या काही दिवसांत केले होते. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे देखील प्रचारात उतरले होते. त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!